Few words

काय लिहावं कधी कधी कळत नाही , मनातलं गोंदळ शब्दातून बाहेर पडत नाही
कधी कधी शब्दच मिळत नाही , का असा होतो उमगत नाही
अस नाही कि मन रिकाम आहे पण कधी कधी कागद कोराच राहतो, विचारांनी भरून ही
खूप गर्दीत ही  एकटं असल्याचं वाटतं आणी एकटं असलं तरी खूप गर्दी असल्यासारखी वाटते

आयुष्यात खूप गोष्टी कमावतो ,गमावतो , कधी कळत कधी नकळत , कधी हरवलेला गवसतं
कधी गवासलेलं  हरवतं , आयुष्य म्हणजे हेच असतं , थोडं शोधणं , थोडं हरवणं , थोडं हसणं ,थोडं रडणं
पण सगळ्या गोष्टींचा दिलखुलास अनुभव घेणं . नेमका शब्दात पकडता नाही आला तरी चालेल पण वाटणं महत्वाचं.. 

Comments

Popular Posts